हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी ...... | नक्कीच वाचा : विचार करा.

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी ...... नक्कीच वाचा : विचार करा.

Indian girls


एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली, तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द जुळवून मी तिला सांगितलं. "मला घटस्फोट हवाय."
तिने शांतपणे विचारलं - "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिला जाणून घ्यायचं होत. पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलंय हे मी तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो.
माझा बँक बॅलन्स, कार, घर, सगळं मी तिला देऊ केलं. पण मी समोर केलेल्या घटस्फोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या दिवशी तिने माझ्यासमोर घटस्फोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटिस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इच्छा होती.

तिची कारणे साधी होती. महिन्याभरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूमपर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होतं तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय. पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली. घटस्फोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूमपर्यंत नेतान माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ती माझ्या छातीला टेकून होती.

आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
निट बघितलेच नाही हे मला जाणवलं
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय ?
असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिव शी तिला उचलून किंवा सोबन बेडरूमपर्यंत नेताना आमच्या तली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्याप्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तिचं वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचांहा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला. दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होतं. पण तिच्या अटीच पालन करताना मला आंतरीक समाधान मिळत होतं. आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवळीकच संपली होती.

जी परत आयुष्यात येत होती. महिन्याच्या शेवटच्या दिवशी  मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता मला काही ऐकायाच नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरेपर्यंत सोडायचा नव्हता. मी वेगाने CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर...

माझी प्रिय
पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हवं ते केलं नाही.
जे प्रेम, जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही. महत्वाचं आहे ते "प्रेम, जवळीक आणि विश्वास"

वाचा आणि विचार करा. स्वत:ला विचारा  "आपलं वैवाहीक आयुष्य खरंच सुखाचं आहे?" या कहाणीचा एकच संदेश आहे.

" जे आहे, जे प्रेमात आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा. नाही तर पश्याताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या