देव दगडात असतो की नसतो ? | Marathi Sanskar

देव दगडात असतो की नसतो ?


एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान (अति हुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.

जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी  विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की, " स्वामीजी बघा ना काय मूर्ख लोक असतात ? खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात. किती मूर्खपणा आहे हा ? मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे. तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही." सगळा मूर्ख पणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का ? आणि ती व्यक्ती खदखदा हसू लागली. 

हे सर्व स्वामी विवेकानंदांनी शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की, "तुमच्या पाठी मागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का ? "

त्या व्यक्तीने होकारार्थी मान डोलावून म्हटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."

स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले. ती व्यक्ती निरूत्तर झाली.


त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर काढून आणून ठेवण्यास सांगितलं. त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणून ठेवला.

स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले की
आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
ती व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाली.  "काही तरीच काय सांगताय स्वामीजी ? मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो ?"

स्वामी विवेकानंद म्हणाले, "तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत." 
त्यावर ती व्यक्ती म्हणाली "मी या फोटो मध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
   
यावर स्वामी विवेकानंद म्हणाले की
"जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते."
हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागू लागला.

परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.


   संत तुकाराम महाराज म्हणतात.जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा

   
देव जाणून घेण्यासाठी पैसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो. देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा. देवाची श्रध्देने का होईना पूजा करता ना ? मग माणसातल्या देवाला कधीच विसरू नका.

इतरांना छळले किंवा पिडा दिली की त्यांचे तळतळाट लागल्यावाचून राहत नाहीत हेही खरेच आहे.

प्रतिष्ठा निर्मळ असावी कार्य चोख असावे.
विश्वासघात हा आत्मघाताइतकाच भयंकर असतो.



तुम्ही किती श्रीमंत आहात यापेक्षा कसे श्रीमंत झालात हे खूप महत्वाचे आहे..

मराठी प्रेरणादायी विचार,
Marathi vichar,
Marathi Sanskar,
Marathi suvichar, 
सर्व पाहण्मासाठी वरी किल्क करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या